संत नामदेव महाराज जीवन चरित्र माहिती

________प्रस्तावना______________________________________________
                           महाराष्ट्रातील महान संतान पैकी एक म्हणजे संत नामदेव महाराज.होय. नामदेव महाराज हे ज्ञानदेवांचे समकालीन होते. त्यांची विठ्ठलावर खूप भक्ती होती.त्यांनी ही विठ्ठल भक्तीवर व समाजहितासाठी अभंग रचले.त्यांनी मराठी भाषे बरोबरच हिंदी,पंजाबी आदि भाषेत अभंग रचले.त्यांनी महाराष्ट्र बाहेरही भागवत धर्माचा प्रसार केला.नामदेव महाराजांन बदल माहिती.
_____________________________________________________________






—————परिचय————————————————————
•नाव - नामदेव दामाशेठ रेळेकर
•आई चे नाव- गोणाई
•जन्म - २६ ऑक्टोबर १९७० (नरसी -बामणी)
•समाधी -३जुलै १३५० (पंढरपूर)
•गुरु -विसोबा खेचर
_____________________________________________________________

                      महाराष्ट्रातील महान संतान पैकी एक म्हणजे संत नामदेव महाराज होय.नामदेव हे ज्ञानदेव, गोरोबा काका,चोखामेळा यांचे समकालीन होते.
त्यांचा जन्म.२६ ऑक्टोबर रोजी झाला. त्यांच्या जन्म गावा बदल एक मत नाहीय. हिंगोली तालुक्यातील नारसी-बामणी गावात झाला असावा त्या बदलचे पुरावे, अभंग आढळतात. आता ते नरसी नामदेव या नावाने प्रसिद्ध आहे.

                       नामदेवांचे आई - वडिलांनी पुत्रप्राप्तीसाठी पंढरपूरच्या विठ्ठला कडे नवस केला होता.मग ते पुढे पंढरपूरलाच स्थायिक झाले. नामदेवांचे बालपण ही पंढरपूरलाच गेले.नामदेवांचे वडील शिंपी काम करत होते.आधीपासूनच नामदेवांच्या घरात विठ्ठल भक्तीचे वातावरण होते.त्यामुळे साजिकच नामदेवांनाही विठ्ठल भक्तीची ओढ निर्माण झाली.ते पूर्णपणे विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले.
                                                                                                    ∆∆∆
                      नामदेव महाराज लहान असताना ते विठ्ठला नैवद्य दाखविण्यासाठी गेले.पण विठ्ठल नैवद्य खात नाहीय हे पाहून ते नाराज झाले.मग ते विठ्ठलाच्या
 पायावर आपले डोके आपटू लागले.भक्ताची तळमळ पाहून विठ्ठल प्रगट झाले व नामदेवांच्या हातून नैवद्य खला.
                                                                                                     ∆∆∆
         पुढे नामदेवांचा विवाह राजाईशी झाला.त्यांना नारायण महादेव,गोविंद,आणि विठ्ठल हे चार पुत्र झाले.आणि लिंबाई नावाची मुलगी झाली. घरची सर्व जबाबदारी नामदेवांनवर आली.पण ते विठ्ठल भक्तीत पूर्णपणे वाहून गेले होते.त्यांना त्यांच्या जबाबदारीचे भान उरले नाही.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाकडून   त्यांना विरूद्ध होऊ लागला.पण नंतर सर्व उलट झाले सर्वच कुटुंब विठ्ठल भक्तीत पूर्णपणे वाहून गेले.
                                                                                                     ∆∆∆
                           ज्ञानदेव व त्यांचे भावंडे पंढरपूरला आले होते तेव्हा त्यांची नामदेवांची भेट झाली. नामदेवांना कळाले की आपली भक्ती गुरुविणा आपुरीच आहे.ह्याची जाणीव त्यांना ज्ञानदेवांची भेट झाल्यानंतर झाली. पुढे ते विसोबा खेचर- ला भेटायला औंढा नागनाथला गेले.तिथे विसोबा खेचर ही पिंडीवर पाय ठेऊन झोपले होते.त्याची नामदेवांना चीड आली.त्या वर नामदेव रागवले त्यांनी विसोबांना बडबड केली.मग विसोबा म्हणाले की  तोच माझे पाय उचलून खाली ठेव.पण नामदेव जिथे विसोबाचे पाय ठेवायचे तिथे पिंड तयार झाली. नामदेवांना आपली चूक कळाली.मग नामदेवांनी आपली चूक मान्य केली.विसोबांना गुरु करून घेतले.
                                                                                                   ∆∆∆
                    काही वर्षांनंतर ज्ञानदेव पुन्हा पंढरपूरला आले.त्यांनी नामदेवांना आपण तीर्थ यत्रेला जाऊ आशी विनंती केली.पण नामदेव म्हणले की माझे सर्व तीर्थ  हे पांडुरंगाच्या चरणी आहे. ज्ञानदेवांनी त्यांना समजावले शेवटी नामदेव तीर्थ यात्रेस निघाले.या यात्रेस अनेक संत मंडळी सहभागी होते.त्यांनी भागवत धर्माचा ही प्रसार केला.तीर्थ यत्रा झाल्या नंतर ज्ञानदेवांनी आळंदीला येऊन सर्व संत मंडळी च्या समक्ष समाधी घेतली.समाधीचे संपूर्ण वर्णन नामदेवांनी त्यांच्या अभंगात केले आहे.
                                                                                                     ∆∆∆
                  नामदेवांनी महाराष्ट्र बाहेरही भागवत धर्माचा प्रसार केला. दक्षिण भारतासह, सौराष्ट्र,राजस्थान,पंजाब इत्यादी राज्यात जाऊन भागवत धर्माचा प्रसार व मानवतेचा संदेश दिला.त्या त्या प्रदेशची भाषा आत्मसात केली त्यावर अभंग रचले.शीख लोकाचा पवित्र ग्रंथ 'ग्रंथसहिबा' मध्ये  ‘नामदेवजी की मुखबानी’ नावाने ६१ पदे आहेत.हिंदी मध्ये ही त्यांनी अनेक अभंग आढळतात.या यात्रेत त्यांचे अनेक शिष्य बनले.ते ही सर्व नामदेवांनासह पंढरपूरला आले.
                                                                                                     ∆∆∆
                    ऐंशी वर्षांचे वय झाल्यानंतर आपले जिवत कार्य पूर्ण झाल्या आहे हे कळाले नंतर नामदेवांनी विठ्ठला कडे समाधी घेण्याची परवानगी घेतली. संतांची,भक्तांची पायाशी धूळ मस्तकी लागावी म्हणून आषाढ वद्य त्रयोदशी, शके१२७२ रोजी विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या पायरीपशी समाधी घेतली.

(नामदेव महाराज यांची सामधी नामदेव पायरी पंढरपूर)
★ ★ ★


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन चरित्र

Indian philosopher Saint Dnyaneshwar Maharaj biology